दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात   

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात   

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 15 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होत आहे. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत; तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 ते 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येणार आहेत. 

दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरणे आवश्‍यक असल्याने त्यांची सरलवर नोंद करणे आवश्‍यक असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नियमित विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 16 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने शाळांनी भरायचे आहेत. हे अर्ज चलनाद्वारे 16 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले नाहीत, तर विलंब शुल्कासह 16 ते 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा मंडळाने दिली आहे. 

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ 

दुष्काळग्रस्त भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार महसूल मंडळ, गाव, तालुका, जिल्हा तसेच विद्यार्थी किंवा पालकांच्या बॅंक खात्याची माहिती मंडळाने जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांची सर्व माहिती माध्यमिक शाळांनी व्यवस्थित भरावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com