राज्य सरकारने वीजबिलाबाबत 'दिल्ली पॅटर्न' राबवावा; कोणी केली ही मागणी वाचा

राज्य सरकारने वीजबिलाबाबत 'दिल्ली पॅटर्न' राबवावा; कोणी केली ही मागणी वाचा

अलिबाग ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारने लादलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे सरकारने दिल्ली पॅटर्न राबवून राज्यात जनतेचे विज बील माफ करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने अॅड. अजय उपाध्ये यांनी केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी लाक्षणिक उपोषण पुकारले.

कोरोनावर मात करण्यासाठी मार्च ते ऑगस्टच्या दरम्यान केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेवर लादलेला लॉकडाऊन हुकुमशहा तसेच चुकीच्या पध्दतीने लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विज बील भरण्याबाबतदेखील नागरिक असमर्थ आहेत. दिल्ली सरकारप्रमाणे, महाराष्ट्र राज्यात दरमहा विज बील 200 युनिट पर्यंत पुर्णतः माफ करण्यात यावे. याची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून राज्यात सुरु करण्यात यावी. सरकारने  महाराष्ट्रातील जनतेला पुर्णतः वीज बिल माफ करावा. केलेली विज बिलाची आकारणी रद्द करावी. या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने अॅड. अजय उपाध्ये यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. या उपोषणात पाठींबा देण्यासाठी दिलीप जोग आदी उपस्थित होते.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com