उत्तरपत्रिकेवर आता विद्यार्थ्याचे नाव

Mumbai-University
Mumbai-University
Updated on

मुंबई - काही विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर चुकीचा बैठक क्रमांक टाकतात. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात अडचणी येतात, असा दावा करीत मुंबई विद्यापीठाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्याने त्यांचे नाव लिहिणे बंधनकारक केले आहे.

विद्यार्थ्यांची नावे उत्तरपत्रिकांवर लिहिण्यात येणार असल्याने परीक्षेतील गैरप्रकार वाढतील, असा आक्षेप युवा सेनेने घेतला आहे; मात्र या निर्णयामुळे परीक्षेतील गैरप्रकार 100 टक्के थांबतील, असा दावा विद्यापीठाने केला आहे.

गुरुवारपासून (ता. 4) विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षा पुनर्परिक्षार्थींच्या आहेत. या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांवर नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख पटून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये फेरफार होऊ शकतो, असा आक्षेप युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांचे नाव उत्तरपत्रिकेवर लिहिणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले. याप्रकरणी ते शनिवारी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांची भेट घेणार आहेत.

काही विद्यार्थी उत्तरपत्रिकांवर चुकीचे बैठक क्रमांक टाकतात. त्यामुळे निकाल लावण्यात अडचण येते. विद्यार्थ्याचे नाव उत्तरपत्रिकेवर आल्यास ही अडचण दूर होईल. या पद्धतीमुळे गैरप्रकार 100 टक्के थांबतील.
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com