
मुंबई : आज नारळी पौर्णिमा, कोळी बांधवांचा प्रमुख सण. आजच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करुन नैवेद्य दाखवून मिरवणुका काढून वाजत गाजत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदाही मुंबईतील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा साजरी केली पण साधेपणानं. यावेळी कोरोनाचं संकट दूर कर असं साकडं त्यांनी समुद्राला घातलं.
पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अपर्ण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्यानं कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व असते. दरवर्षी कल्याणच्या शिवाजी चौकातून कोळी बांधव-भगिनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत दुर्गाडी खाडीत समुद्राला नारळ अपर्ण करतात. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे मिरवणूक बंद असल्याने यंदा देखील कोळी महासंघाचे अध्यक्ष देवानंद भोईर याच्या हस्ते अतिशय सध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.
कोळी बांधवांचं समुद्राला साकडं
यावेळी जगावर घोंघावणारं कोरोनाचं संकट दूर करण्याचं साकडं कोळी बांधवांनी समुद्राला घातलं. यावेळी देवानंद भोईर यांनी नागरिकांसाठी कोरोना लसीचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा. तसेच मागील काही दिवसात आलेल्या चक्रीवादळ आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोळी बांधवाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्याची त्यांना नुकसान भरपाई दिली जावी अशा सरकारकडे मागण्या केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.