उल्हासनगर - उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे सोबत समझोता झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका..चर्चा चालू झाली आहे, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर मध्ये जाहीर सभेत केला आहे. आंबेडकर हे कल्याण लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी उल्हासनगर मध्ये आले होते, यावेळी त्यांनी आरोप केला.
आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरंच लढणारा आहे, का नुरा कुस्तीचा.. चर्चा हीच आहे, की ही नुरा कुस्ती आहे.. एकनाथ शिंदे सोबत समझोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका चर्चा चालू झाली आहे असा, आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केला आहे.
आंबेडकर पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवीचे राजकारण सुरू आहे असं आंबेडकर म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.