ठाणे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार नाही : सुभाष देसाई

बारवी धरणाचे जलपूजन करताना उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार किसन कथोरे व इतर
बारवी धरणाचे जलपूजन करताना उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार किसन कथोरे व इतर

बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेल्या बारवी धरणाचे जलपूजन गुरुवारी उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे हे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे देसाई म्हणाले. 

पाण्याची पातळी वाढल्याने कोळे वडखळ गावात पाणी शिरले आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे सरकारचे धोरण असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. आमदार किसन कथोरे, एमआयडीसीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांनी पुनर्वसनासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे देसाई यांनी आभार मानले. यावेळी बारवी धरण उंची वाढवण्याचा प्रकल्प यशस्वी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरुण कटाळे, भाजप तालुकाध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते. 

दोन वर्षातील मेहनत यशस्वी 
धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली. प्रत्यक्ष गावात जाऊन पहाणी केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यावर तोडगा काढून निर्णय घेतल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षातील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे. आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com