Why are Thane farmers delaying Kharif sowing?
esakal
ठाणे : यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्याने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी प्रतीक्षा करावी लागत (Thane monsoon delay impact on Kharif sowing) आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किमान १०० मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानाधारित कृषी सल्ल्याचे पालन करावे, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.