

Thane Water Supply
Esakal
ठाणे : उन्हाचे चटके वाढत असताना ठाणेकरांवर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे सावट आले आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी महापालिका क्षेत्रातील वागळे, मुंब्रा-कळवा परिसरामध्ये गुरुवारी (ता. २३) ते शुक्रवारी (ता. २४) तब्बल २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार असून पाणी साठवणूक आणि नियोजनाचा ताण वाढणार आहे.