मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील 97 आदिवासी गावे व 259 पाड्यांना नाशिक जिल्ह्यातील भावली धरणातून ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेच्या खर्चास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
ही बातमी वाचलीये का... 'या' पोराने 'गुगल'ला येडा बनवून खाऊ घातला पेढा..
पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्चाच्या निकषांच्या 100 टक्क्यांहून अधिक दरडोई खर्च असणाऱ्या योजनांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांशी आदिवासी वस्ती असून हा भाग डोंगराळ व दुर्गम आहे. बहुतांश गावांमध्ये अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांचे स्रोत भूजलावर अवलंबून आहेत आणि उन्हाळ्यामध्ये स्रोत कोरडे पडत असल्याने या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.
महत्वाची बातमी जेव्हा कुणाल कामरा थेट राज ठाकरेंना उघडपणे देतो लाच...
ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेस मान्यता मिळाल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभय महाजन, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
These 'tribal villages' in Shahapur now supply grid water from Bhavli Dam
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.