Kavita Jaiswal
sakal
विरार - मुसळधार पावसामुळे वसईत दुर्घटना घडण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, लागोपाठ पावसात तिसरा बळी गेला आहे. वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंड मधील मणिचापाडा येथील बकरा कंपाउंड मध्ये काल दुपारी ३ वाजता ही घटना घडली आहे. बळी गेलेल्या मुलीचे नाव कविता दूधनाथ जैस्वाल असून ती गोरेगाव येथील राहणारी होती.