Jal Jeevan Mission

Jal Jeevan Mission

ESakal

Jal Jeevan Mission: कर्मचारी आर्थिक संकटात! जलजीवन योजनेतील मानधन तीन महिन्यांपासून थकीत

Central Government Yojana: आदिवासी आणि दुर्गम भागातील घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी जल जीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत कार्यरत कर्मचारी आर्थिक संकटात आले आहेत.
Published on

ठाणे : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. मात्र या योजनेत कार्यरत जिल्हा तज्ज्ञ, बीआरसी कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून मानधन थकले असून, आर्थिक गणिते कोलमडली आहेत. परिणामी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात हे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com