राज्यात दोन लाख उपचाराधीन रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्यात आज ४४,४८८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे मनपा आणि पुणे मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर होत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून १,७३,२३८
२,०२,२५९ इतकी झाली आहे. आज १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा १,४१,६३९ इतका झाला आहे.
नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला आणि नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ठाणे ९, पुणे २, लातूर १ मृत्यू नोंदवला गेला. राज्यात आज मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,२०,०४४ झाली आहे. राज्यातील मृत्युदर २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज १५,३५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६५,७२,४३२ इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९४.९८ टक्के इतके झाले आहे.
...