वीजवाहिन्यांजवळ पतंगबाजी नको
मुंबई, ता. १४ : अदाणी इलेक्ट्रिसिटीने (एईएमएल) मुंबईकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाच उच्चदाबाच्या वीजवाहक तारांजवळ पतंग न उडवण्याचा सल्ला दिला आहे.
अदाणीतर्फे निवेदनाद्वारे पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्सव आनंदात साजरा व्हावा, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. पतंगाची तार किंवा मांजा, विजेची चांगली वाहक असते. या मांजाचा स्पर्श वीजवाहिन्यांना झाल्यास किंवा तो वीजवाहिन्यांच्या जवळ आल्यास विजेचा जीवघेणा धक्का बसू शकतो. वीजवाहिन्यांजवळ असुरक्षित पद्धतीने पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली तर एईएमएलच्या १९१२२ या हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहनही एईएमएलने केले आहे.