‘प्रत्येकाने एका निरक्षर व्यक्तीला  साक्षर करावे’

‘प्रत्येकाने एका निरक्षर व्यक्तीला साक्षर करावे’

Published on
‘प्रत्येकाने एका निरक्षर व्यक्तीला साक्षर करावे’ अंबरनाथ, ता. १ (बातमीदार) ः कोरोनाच्या जागतिक संकटानंतर हळूहळू जनजीवन पूर्व पदावर येत आहे. शाळांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची किलबिल सुरू झाली आहे. वैभवशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी देशातील प्रत्येक नागरिक साक्षर झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मयूरेश वारके यांनी केले. महात्मा गांधी विद्यालयात अंबरनाथमधील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. वारके यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमात मोजक्याच विद्यार्थी गटाने सर्वांगसुंदर सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक सादर केले. सुरेल समूहगीत गायन, निवडक भाषणे आणि सांगीतिक योगासन याचे नेटके सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. बाळासाहेब गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. वारके यांच्या हस्ते या कार्यक्रमात १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक प्रदान सोहळा झाला. शाळेच्या नवीन मैदानाच्या सुशोभीकरणात महत्त्वाचे योगदान असणारे गोपाळ अडगापुरी आणि मारुती मेहेत्रे या कार्यकर्त्यांना गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com