
विकास योजनांच्या जनजागृतीसाठी पथनाट्य
विरार, ता. १३ (बातमीदार) ः जिल्हा परिषदेच्या अनेक चांगल्या योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहचत नाहीत. त्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्याचा लाभ नागरिकांना घेता यावा, यासाठी जिल्हा परिषद पालघर विशेष घटक योजनेअंतर्गत विविध विकास योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती म्हणून विरारच्या माय नाटक कंपनीच्या कलापथक कलाकारांमार्फत वसईत पथनाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनांची माहिती मिळावी म्हणून यामध्ये ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान वसई पूर्वेतील सायवन, शिरवली, तिल्हेर, माजिवली, पारोळ शिवनसई, चांदीप, मांडवी, शिरसाड, खनिवडे, सकवार तसेच विरार, सोपारा फाटा, वसई फाटा, पेल्हार, अर्नाळा, कळंब, सत्पाळे या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण विभाग व जिल्हा माहिती कार्यालय, पालघर (अंतर्गत) जनजागरण अभियानातील या पथनाट्याचे दिग्दर्शन महेश सापणे यांनी केले आहे; तर रूपक मराठे, मानसी जाधव, शुभम जादा, अक्षरा मांडवकर, द्वेष पोकळे, मेघना गणगे, भुमिक बांद्रे, तृप्ती सोनावणे, तनिष जाधव, पूजा मोहिते आदी कलाकार पथनाट्य पथकात आहेत.
जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही जनजागृती आम्ही करत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिक पुढे येऊन योजनांची माहितीही जाणून घेत आहेत.
- महेश सापणे, पथनाट्य, दिग्दर्शक
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..