अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसराने घेतला अखेर मोकळा श्वास
अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) ः अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावरील बेकायदा विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
अंबरनाथमध्ये रेल्वे स्थानक परिसरासह पूर्ण शहरात फेरीवाले, रिक्षा आणि दुकानदारांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावून नागरिकांचे चालणे सुसह्य करा, वाहतूक कोंडी दूर करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यामध्ये सोमवारी (ता. २१) झालेल्या बैठकीत दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिसांच्या सहाय्याने नागरिकांना चालण्यास अडथळा ठरणाऱ्यांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्यांच्या पालेभाज्या आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी संदीप कांबळे, नरेंद्र संख्ये यांनी कर्मचाऱ्यांसह पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.