कोरोना मृत्यूंची आयसीएमआरमध्ये नोंद नाही
ठाणे, ता. ७ ः राज्य शासनाच्या वतीने मृतांच्या वारसांना दिली जाणारी ५० हजार रुपयांची मदत मिळण्यात कोरोना मृत्यूंची ‘आयसीएमआर’मध्ये नोंद न झाल्याने अडचणी येत आहेत.
मृतांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात आले आहेत; परंतु कोरोना मृत्यूंची ‘आयसीएमआर’मध्ये नसल्याचे उघड झाले आहे. याविषयी चौकशी करण्यासाठी संबंधित वारसांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे धाव घेतली आहे.
ठाण्यात तिन्ही लाटांमध्ये मिळून आजवर २,१२७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर केंद्राने मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले. या प्रयत्नात अनेकांना अपयश आले आहे. अर्ज भरताना कोरोना मृत्यूंची ‘आयसीएमआर’कडे नोंदच नसल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले आहेत. मदत मिळेल की नाही, याबाबत शंका वाटत आहे, असे करुणा शेळके यांनी सांगितले; तर नव्याने कागदपत्रे पालिकेकडे सुपूर्द केल्याचे रवी सिंग म्हणाले.
संकेतस्थळावर मृतांची नोंद नसल्यास ‘जीआरसी’वर अपील करण्याची संधी दिली जात आहे. अपिलात गेलेल्या अनेकांनी सोमवारी पालिका मुख्यालयात धाव घेतली. पालिकेने अपिल अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत.
...
कोरोना चाचणीच्या वेळी आधार क्रमांक घेतला जातो. चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास त्याची नोंद ‘आयसीएमआर’कडे होत असते. तशी नोंद होणे अपेक्षित आहे. पालिकेने मृत्यूंची नोंद ‘आयसीएमआर’कडे करणे अपेक्षित होते. त्यांची ही चूक आहे.
- मनोहर डुंबरे, माजी गटनेते, भाजप
...
काही वेळेस मृत्यूचे कारण दाखवले जात नाही. अशांसाठी पुन्हा एक संधी दिली जाते.
- मनीष जोशी, पालिका उपायुक्त
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.