
आरटीई प्रवेशाकरीता मुदतवाढ
ठाणे, ता. २१ (बातमीदार) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बालकांच्या पालकांनी विहित वेळेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
आर.टी.ई. प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया राज्यस्तरावरून पूर्ण करण्यात आली असून या निवड यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १०,४२९ अर्जांची निवड करण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीकरीता शिक्षण विभागाकडून २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, बुधवारपर्यंत ४४२९ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तेव्हा उर्वरित बालकांच्या पालकांनी सरकारने दिलेल्या प्रक्रियेचा लाभ घेऊन येत्या २९ एप्रिलपर्यंत पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
प्रवेश प्रक्रियेतील निवड झालेल्या बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरचीची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती आणि कागदपत्रे शाळेत पालकांनी जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..