ओबीसी संघर्ष मोर्चासाठी गावोगावी प्रचार
पालघर, ता. २५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात ओबीसी आरक्षण शून्य टक्के दाखवल्याने या अन्यायाविरोधात पालघर जिल्हा ओबीसी संघर्षाने आवाज उठवला आहे. या अन्यायाविरोधात ओबीसी संघर्षतर्फे २९ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी, समाजाच्या अस्तित्वासाठी व मोर्चामध्ये अधिकाधिक जण उपस्थित राहावे यासाठी मोरे भंडारी समाजातर्फे भंडारी समाजाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर, माजी अध्यक्ष सुभाष मोरे व अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध गावात भेटी दिल्या. यात घिवली, दिलेवाडी, सालवड, ऊनभाट, वेंगणी व पोफरण या गावांचा समावेश आहे. ओबीसी संघर्षच्या मोर्चाला समाजातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच आरक्षण न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.