सर्वसामान्य मतदार सर्वात शक्तिमान

सर्वसामान्य मतदार सर्वात शक्तिमान

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग : भारतीय स्वातंत्राला ७५ वर्षे झाली आहेत. आता देशातील लोकशाही अधिक परिपक्व झाली असून इतक्या वर्षांत लोकशाही मूल्यांची रुजवात अधिक खोलवर झाली आहे. राजघटनेतून दिलेल्या अधिकाराने सर्वसामान्य मतदार सर्वशक्तिमान झाला आहे. त्याच्या हातात सत्ता उलथवून लावण्याची ताकद असल्याने भारतीय लोकशाहीला भविष्यात कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ घटनातज्‍ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी केले.
अलिबागमधील आदर्श भवनात ‘भारतीय राज्यघटना आणि संसदीय लोकशाही’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बापट यांनी, राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थिती, राज्यघटना आणि बदललेली संसदीय लोकशाहीबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमास अलिबागमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संसदीय लोकशाहीबाबत बापट यांनी, विविध उदाहरणांसह माहिती दिली. शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. घटना बदलाबाबतही बापट यांनी मत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.