भेरवमधील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली

भेरवमधील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली

Published on

पाली, ता. १८ (वार्ताहर) ः भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सुधागड तालुक्यातील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून भेरव येथील अंबा नदीच्या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपर्यंत भेरव नदीवरील पूल पाण्याखाली होता. त्यामुळे विद्यार्थ्‍यांसह नोकरदार वर्ग, प्रवाशांचे हाल झाले.
भेरव पूल पाण्याखाली गेल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला शाळेत जाता न आल्‍याने विद्यार्थ्यांना सुटी मिळाली, मात्र नोकरदारांची कामावर जाण्याची पंचायत झाली. सकाळपासून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काहींनी उद्धरमार्गे प्रवास केला मात्र मोठा वळसा घालून जावे लागल्‍याने वेळ व पैसा नाहक खर्ची पडला.
सुधागडामध्ये सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले. अतिवृष्टी मध्ये सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा, पाली नदीवरील पूलही दरवर्षी पाण्याखाली जातात. परंतु आता नवीन पुलांची उंची वाढवल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. या पुलावरून वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील सखल भागात, नदी किनारी राहणाऱ्यांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला.

पाली ः भेरव गावातील पूल पाण्याखाली गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.