आपत्ती बचावासाठी हजार कोटी

आपत्ती बचावासाठी हजार कोटी

आपत्ती बचावासाठी हजार कोटी

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : महापूर, दरडी कोसळणे, उधाण, अतिवृष्टी, वणवे अशा सर्वच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दरवर्षी सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींची वित्तहानी होते, त्याचबरोबर जीवितहानीलाही सामोरे जावे लागते. दरवर्षी वाढत जाणारा नैसर्गिक आपत्‌तीचा धोका कमी करण्यासाठी ‘कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना’ राबवण्यात येत असून रायगडमधील नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या एक हजार १० लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
आपत्ती निवारणातील काही कामे प्रदीर्घ कालावधीत करावी लागणार आहेत. तर काही कामे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत प्रस्तावास निधी मंजूर केला आहे. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असून त्या उभारण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक हजार ८०० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. यातील एक हजार १० लाख कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्‍याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
२००५ पासून नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु इतक्या व्यापक प्रमाणात प्रमाणात पहिल्यांदाच उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन व जुन्या खार बांधांचे नूतनीकरण करणे, समुद्र धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण गावांमध्ये बहुउद्देशीय निवारा केंद्र बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण प्रमुख तालुका मुख्यालय व आपत्तीप्रवण गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, महाड शहरनजिक सावित्री नदीलगत संरक्षक भिंत बांधणे, बीएसएनएलच्या केबल भूमीगत टाकणे, महाड नगरपरिषदेसाठी आवश्यक आपत्कालीन सोयी-सुविधा निर्माण करणे, निवारा शेडमध्ये आवश्यक शोध व बचाव साहित्य उपलब्ध करण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे.

जिल्ह्यात राबवण्यात येणारी कामे (रक्‍कम कोटी)
खार प्रतिबंधक जुने-नवे बंधारे - ७५.८६
समुद्र धूपप्रतिबंधक जुने-नवे बांध - ७५.००

बहुद्देशीय निवारा केंद्र
१४ गावांमध्ये निवारा शेड - ५.६०
महाडमध्ये २० निवारा शेड - ३६.५६
महाड जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती - १.१७
चक्रीवादळ निवारा केंद्र -४१.५०
अलिबाग उपविभागांतर्गत १७ शाळांची दुरुस्ती - ३.७१
महाडमध्ये नवीन २८ निवारा केंद्र - ६५.४९
महाडमध्ये निवारा केंद्रासाठी भूसंपादन - ६.३३
जिल्‍ह्यातील भूमिगत विद्युत वाहिनी - ६९९.६८
------
एकूण - १०१० .९० कोटी


नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी निवारा शेडची गरज आहे. यांचा वापर बहुद्देशीय कारणांसाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या शाळांची दुरुस्ती करून त्यांचा वापर निवारा शेड म्हणून करणे शक्य असल्यानेही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. निवाराशेडसह गावांमधील शाळांमध्ये आश्रय घेण्यासाठी तेथील शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. उधाणाचा धोका टाळण्यासाठी खारबांधबंदिस्तीही सूचवण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना झाल्यास वित्तहानीसह जीवितहानी टाळता येईल.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com