जनजीवन विस्कळीत

जनजीवन विस्कळीत

Published on

जनजीवन विस्कळित

पाली, ता. १५ (वार्ताहर) ः मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्‍याने मंगळवारी रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले होते. सावित्री, अंबा व कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. मुंबई-गोवा महामार्गावर चिकणी व खांब गावाजवळ पाणी साठले होते. काही ठिकाणी पुलावरून पाणी गेले, तर महाड शहरात पाणी शिरले होते. धामणसे येथे अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आपदा मित्र, आपत्ती व्यवस्थापन संस्था व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था मदत कार्यात पुढाकार घेत होते. अलिबाग-तळा रस्‍त्‍यावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे तेथील वाहतूक बंद होती.
मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी महाड शहरात शिरले होते. रावढळ पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद होती. विन्हेरे विभागातील नागेश्वरी नदीपात्र तुडुंब भरून गावातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत होते. महाड शहरांमधील रायगड कडे जाणाऱ्या दस्तुरी मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com