शिवभोजन योजनेला घरघर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : शिवसेना ठाकरे सरकारने २०२० मध्ये सुरू केलेल्या शिवभोजन योजनेला अखेरची घरघर लागली आहे. कोरोना काळात गोरगरीब कामगारांना कमी किमतीमध्ये अन्न मिळावे म्हणून या योजनेला प्रोत्साहन देण्यात आले होते. जिल्ह्यात ३०० हून अधिक शिवभोजन केंद्रे त्या वेळी अस्तित्वात होती, यातील फक्त ७२ केंद्रे सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात येते. यातीलही अनेक केंद्रांचा शोध घेऊनही सापडत नाहीत. यामुळे ही योजनाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
गतवर्षी संपूर्ण राज्यासाठी २७४ कोटींचा निधी या योजनेसाठी देण्यात आला होता, यंदा फक्त ७० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे अनुदान मिळत नसल्याने बहुतांश केंद्रचालकांनी शिवभोजन योजनेतून काढता पाय घेतला आहे. यातील फारच थोडा निधी रायगड जिल्ह्याच्या वाट्याला आला आहे. वेळेत अनुदान मिळत नसल्याचे शिवभोजन केंद्रचालकांचे म्हणणे आहे.
राज्यातील गरीब आणि कष्टकरी लोकांना पोटभर आणि चांगले जेवण मिळावे यासाठी २०२० मध्ये १० शिवभोजन थाळी योजना सुरू केली. याचा सर्वात जास्त फायदा कोरोना कालावधीत झाला. लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असताना कष्टकरी जनतेकडून शिवभोजन केंद्रातील जेवणासाठी मागणी वाढली होती. त्यामुळे तत्कालीन सरकारने जिल्ह्यात ३०० हून अधिक शिवभोजन केंद्रे सुरू केले होती. यातील जेमतेम ७२ केंद्रे सुरू असून, तीदेखील टप्प्याटप्प्याने बंद पडत आहेत.
शिवभोजन योजनेतून जिल्ह्याकरिता दरदिवसासाठी आठ हजार ७५० थाळ्या मंजूर आहेत. १० रुपयात जेवण देण्याची ही योजना होती. शहरी भागासाठी सरकारकडून ४० रुपये, तर २५ रुपये ग्रामीण भागातील केंद्रांना सरकारकडून अनुदान दिले जात होते. सद्यःस्थितीत निधी उपलब्ध होत नसल्याने हे अनुदान देण्यात अडचणी येत आहेत.
- सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.