पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
रायगड जिल्ह्यात योजनेला अल्प प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : खरीप हंगामातील आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळावा, म्हणून
प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे; पण या योजनेला रायगड जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
पेरणी न होणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रायगड जिल्ह्यात ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबवली. पीक विम्याची नोंदणीसाठी कंपनीमार्फत जनजागृती करण्यात आली होती. शेतावर जाण्यापासून वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून विमा नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते; पण जिल्ह्यातील फक्त नऊ हजार ९१७ शेतकऱ्यांनी तीन हजार ८३४ हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.