साहित्य संगम सोहळ्यात आगरी भाषा जतन व वृद्धीचा संकल्प कवी साहित्यिक व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान
साहित्य संगम सोहळ्यात आगरी भाषा वृद्धीचा संकल्प
कवी साहित्यिक व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान
पाली, ता. ८ (वार्ताहर) ः बोर्ली मांडला येथे नुकताच साहित्य संगम सोहळा पार पडला. यावेळी आगरी भाषा जतन व वृद्धीचा संकल्प करण्यात आला. तसेच कवी, साहित्यिक व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आगरी भाषेचे अस्तित्व आता लेखणीच टिकवू शकते, असे प्रतिपादन ॲड. मानसी म्हात्रे यांनी यावेळी केले. या सोहळ्यात युवा कवी नंदेश गावंड लिखित आगरास्त्र या काव्य संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात हरिचंद्र दळवी लिखित एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे या कविता संग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक कवी कैलास पिंगळे, ॲड. राकेश पाटील, तृप्ती गावंड, दीनानाथ पाटील, सुरेश भोपी, अमृत पाटील, नविनचंद्र राऊत, हरीचंद्र दळवी, अनंत भोईर, गोरखनाथ पाटील, अरुण म्हात्रें आदींचा सन्मान करण्यात आला.
आगरी जगातील सर्वात गोड भाषा
धम्मशील सावंत म्हणाले की, जगातील सर्वात गोड भाषा म्हणून आगरी भाषा ओळखली जाते. आगरी समाज हा शूर वीर व लढवय्या समाज आहे. आता नवोदित कवी साहित्यिक लेखणीच्या माध्यमातून आपली संस्कृती, मायबोली व भाषा टिकवत आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे सावंत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.