वादळी पावसामुळे घरांचे नुकसान

वादळी पावसामुळे घरांचे नुकसान

महाड, ता. १ (बातमीदार) : महाड तालुक्यातील झालेल्‍या वादळी पावसामुळे अनेक घरांची कौले व छपर उडून गेली. पावसामुळे पाने व रावतळी मानेची धार या दोन गावांमध्ये १८ घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील रायगड भाग, वाळण खोरे तसेच पोलादपूरमधील ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला. डोंगराळ भागामध्ये असलेल्या रावतळी मानेची धार या गावांमधील सात घरांचे तसेच एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. वाळण खोऱ्यामध्ये पावसाने जोरदार तडाखा दिला. पाने गावांमधील अनेक घरांची कौले व पत्रे उडून गेली तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्‍या आहेत. पाने गावांमधील दहा घरांसह बालवाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. रमेश सुतार, संतोष दानावले, दिपक कनोजे, राजू पवार,शिंदे यांच्या घरांचे संपूर्ण पत्रे उडाले. यातील काही जण सूरतमध्ये वास्तव्यास आहेत. या पावसामुळे अंतिम टप्प्यांमध्ये तयार होत असलेल्या आंब्याला देखील मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाले आहे.

वादळी पावसाने १८ घरांचे, बालवाडी, गोठ्याचेही झाले आहे. आणि कुठे नुकसान झाले आहे का, याबाबत माहिती घेत आहोत.
- अरविंद घेमुड, तहसीलदार

महाड - पाने गावात झालेले नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com