पसायदानातून एकात्मतेचा संदेश

पसायदानातून एकात्मतेचा संदेश

Published on

महाड, ता. ४ (बातमीदार) : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंतीनिमित्त १५ ऑगस्टला होणार आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत गुरुवारी (ता. १४) पसायदान पठणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदर्श समाज व्यवस्थेचे आठशे वर्षांपूर्वी स्वप्न पाहणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पसायदान विश्वासाठी एकात्मतेचा संदेश देते. पसायदान म्हटल्याने सामाजिक भावनेबरोबर आत्मिक समाधान लाभते. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ९००० ओळींचे सारांश असलेले पसायदानाचा अर्थ खूपच प्रगल्भ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पसायदानाचा अर्थ समजावा, या उद्देशाने १४ ऑगस्टला सर्व शाळांमध्ये सामूहिक पसायदान पठण केले जाणार आहे. १५ ऑगस्टला गोकुळाष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ या अमृतवाणीच्या सामूहिक पठणातून विद्यार्थ्यांमध्ये सद्भाव, सहिष्णुता आणि आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा शासनाचा हेतू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात हे अभियान केले जाणार आहे.
...........
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार महाड तालुक्यातील शाळांमध्ये पसायदान पठणाबाबत अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. - राजन सुर्वे, गट शिक्षणाधिकारी, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com