गणेशोत्सवात नारळाला भाव
महाड, ता. ३ (बातमीदार) : धार्मिक कार्यक्रमांमध्ये नारळाला खूपच महत्त्व आहे. अशातच जिल्ह्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख ५५ हजार गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. पूजेला नारळाची म्हणजे श्रीफळाची आवश्यकता भासते. प्रत्येक पूजेला किमान पाच नारळांची गरज असते. तसेच गणेशाला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळाचे ओले खोबरे वापरले जाते. अनेकजण यानिमित्त घरामध्ये सत्यनारायणाची पूजादेखील करतात. गौरीपूजन, ओवशासाठी नारळाची गरज लागते. रायगड जिल्ह्यामध्ये नारळाची विक्री पाच कोटींच्या घरात गेल्याने व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
-------------------------------------------
परराज्यातून आवक
कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू येथून नारळांची मोठी आवक झाली आहे. कोकणातील नारळाचे पाणी, खोबरे अधिक गोड, चवदार असते, त्यामुळे कोकणातील केळशी, आंजर्ले, दापोली, रत्नागिरी येथील नारळांनाही मागणी आहे. बाजारात अनेक ठिकाणी केवळ नारळाचे विक्रेते आहेत. बाजारात वेगवेगळ्या आकारानुसार नारळ उपलब्ध असून २५ रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
.....
गणेशोत्सवामध्ये नारळाची आवक मोठी झाली असून विक्री चांगली आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत बाजारात नारळाची मागणी राहणार आहे.
- दिनेश नाजरे, व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.