राज्यात मलेरियाने मृत्यूवर अंकुश

राज्यात मलेरियाने मृत्यूवर अंकुश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईसह राज्यात मलेरियामुळे २०२२ मध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०२३ मध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत यंदा जानेवारी ते एप्रिलपर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने राज्य सरकारकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे मृत्यूचा आलेख घसरला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी २००७ मध्ये २६ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मलेरियाचा धोका, प्रतिबंध आणि उपचारांबाबत या माध्यमातून जनजागृती करणे हा यामागचा उद्देश होता. या जनजागृतीचा परिणाम सध्या राज्यात दिसू लागला आहे. पाच वर्षांपूर्वी मलेरियामुळे सरासरी ५० रुग्ण मृत्युमुखी पडत होते. मात्र, त्यात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. २०२३ मध्ये राज्यात दररोज सरासरी ४४ प्रकरणे आढळून आली होती. यंदा, आता रोजची सरासरी संख्या २२ रुग्णांवर आली आहे.
--------------------------
मलेरिया निर्मूलनाचे प्रयत्न
मलेरिया हा आजार ॲनोफिलीस डासाच्या चाव्याद्वारे पसरतो. या डासांना प्रतिबंध करण्यासाठी पहिल्यांदा जागतिक मलेरिया दिन २००८ मध्ये साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आरोग्य विभागाने कीटकनाशकांची फवारणी करणे, डासांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे आणि जनजागृती केली आहे. परिणामी, देशातील २१ राज्ये मलेरियामुक्त घोषित केली जाऊ शकतात; तर उर्वरित राज्ये २०२५ ते २०२७ दरम्यान मलेरियामुक्त होतील.
-------------------------------
वर्ष रुग्ण मृत्यू
२०२१ १९३०३ १४
२०२२ १५४५१ २६
२०२३ १६१५९ १९
२०२४ २६५० ०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com