३८ फरार, पाहिजे आरोपींची धरपकड

३८ फरार, पाहिजे आरोपींची धरपकड

Published on

३८ फरार, पाहिजे आरोपींची धरपकड
मुंबई, ता. २५ ः विशेष अभियानांतर्गत मध्य मुंबईतील परिमंडळ चारने विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या चार तर शोध सुरू असलेल्या ३४ आरोपींना बेड्या ठोकल्या. यात ३६ वर्षांपूर्वी घडलेल्या खंडणीच्या तर ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींचा समावेश आहे. पोलिस उपआयुक्त आर. रागसुधा यांनी पुढाकार घेत ११ ते २० जूनदरम्यान हे विशेष अभियान राबविले. त्यासाठी अखत्यारीतील माटुंगा, सायन, काळाचौकी, भोईवाडा, रफी अहमद किडवाई मार्ग, अँटॉप हिल, वडाळा ट्रक टर्मिनल या सात पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमून त्यांच्यावर पाहिजे व फरार आरोपींना अटक करण्याची जबाबदारी सोपवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com