जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत ३० टक्के घट
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत ३० टक्के घट
संपाचा दुसऱ्या दिवशी ७० टक्के वाहनचालकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यातील मालवाहतूक संघटनांनी ई-चालान प्रणालीद्वारे होणाऱ्या दंडवसुलीविरोधात आणि इतर मागण्यांसाठी बुधवार (ता. २)पासून संप पुकारला आहे. दुसऱ्या दिवशी या संपाचा मुंबईतील ट्रक, कंटेनर, टेम्पो वाहतुकीवर ७० टक्के परिणाम झाला. दरम्यान, मुंबईत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत ३० टक्के घट दिसून आली.
मालवाहतूक करणारे ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलरचालक बेमुदत संपावर गेल्यामुळे बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण आणि शहरी भागात पुरवठा साखळी खंडित झाल्याने किमतीत वाढ होऊ शकते. सरकारने तातडीने चर्चा करून तोडगा काढावा अन्यथा जनजीवनावर गंभीर परिणाम होईल, असा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे.
या संपामुळे राज्यभरातील अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले आणि औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हा संप सुरू झाल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. सर्वसामान्य जनतेची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.