गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवा : राज ठाकरे
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण
हटवा : राज ठाकरे
मुंबई, ता. १२ : युनेस्कोकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच वेळी गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
केवळ आनंद साजरा करून थांबता येणार नाही, तर किल्ल्यांचे काटेकोर संरक्षणही आवश्यक आहे, असे स्पष्ट करताना जात-धर्म न पाहता गडकिल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवावीत, अशी ठाम मागणी करून गडकिल्ले ही कोणाची खासगी मालमत्ता नसून छत्रपतींचा वारसा असल्याचे ठणकावून सांगितले. युनेस्कोचा दर्जा अबाधित ठेवायचा असेल तर सरकारने तत्काळ अतिक्रमणविरोधी कारवाई करावी, असे त्यांनी सुचवले.
किल्ल्यांवरील पर्यटन विकासाच्या संधी अधोरेखित करून त्यांनी पायाभूत सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. ही जबाबदारी पार पाडल्यास महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.