दरडप्रवण भागातील 
नागरिकांसाठी प्रकल्प

दरडप्रवण भागातील नागरिकांसाठी प्रकल्प

Published on

दरडप्रवण भागातील
नागरिकांसाठी प्रकल्प
मुंबई, ता. १६ : मुंबईतील दरडप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिल टॉप हट्स पुनर्वसन प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य तुकाराम काते यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. २००० ते २०२४ पर्यंत मुंबईत एकूण ३८४ दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यात १६६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ११२ जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर दरडप्रवण भागांमध्ये नऊ मीटरपेक्षा कमी उंचीच्या संरक्षक भिंतीचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) करीत असून, त्यापेक्षा जास्त उंचीच्या भिंतीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. अशा ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असून, दरडप्रवण भागांतील नागरिकांसाठी स्थलांतर आणि सुरक्षितता धोरण तयार केले जात असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com