माझ्या नुकसानीला एटीएस जबाबदार!
माझ्या नुकसानीला
एटीएस जबाबदार!
सुटकेनंतर मोहम्मद शेख यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्यादिवशी मी आणि माझे कुटुंबीय घरीच होतो. दीडशे चौरस फुटांच्या घरात आम्ही १४ जण राहत होतो. स्फोटानंतर आम्ही घर बंद करून पसार झालो, असा आभास निर्माण करून एटीएसने मला ताब्यात घेतले आणि दोन महिन्यानंतर अटक दाखवली. तोवर एटीएसने खोट्या कबुलीजबाबासाठी अनन्वित अत्याचार केले; पण सत्य कधीच पराजित होत नसते, हे उच्च न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले. या १९ वर्षांत माझे आणि कुटुंबीयांचे जे नुकसान झाले, त्यास फक्त एटीएस जबाबदार आहे, असा आरोप गोवंडीच्या शिवाजी नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहम्मद अली शेख यांनी केला.
उच्च न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल दिल्यानंतर शेख घरी परतले. या प्रकरणाबाबत ते म्हणाले,
सुरुवातीच्या काळात सिमीशी संबंधित शेख यांनी आपले घर बॉम्ब बनविण्यासाठी आणि पाकिस्तानी साथीदारांना आश्रय देण्यासाठी देऊ केले, असा आरोप एसटीएसने ठेवला होता. अटकेनंतर दहशतवादी असल्याचा ठपका फक्त माझ्याच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या माथ्यावर बसला. मकोका न्यायालयाने जन्मठेप ठोठावल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्या धक्क्याने वडील गेले, पाठोपाठ भाऊ गेला. दुःखाच्या प्रसंगात पॅरोल अर्ज मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपये मागण्यात आले. तेवढी ऐपत नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी, मुलीच्या लग्नात सहभागी होऊ शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.