तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

Published on

तानसा तलाव ओसंडून वाहू लागला
मुंबईच्या पाणीसाठ्यात मोठी भर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा तानसा तलाव अखेर आज बुधवारी (ता. २३) रोजी सायंकाळी ५.४० वाजता भरून ओसंडून वाहू लागला. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने ही माहिती दिली असून, सलग तिसऱ्या आठवड्यात तिसरा तलाव भरल्याने मुंबईच्या जलसाठ्यात दिलासादायक वाढ झाली आहे.
तानसा तलाव हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असून, तो मुंबईला नियमितपणे पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक आहे. १४,५०८ कोटी लिटर जलधारण क्षमतेचा हा तलाव मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा स्रोत मानला जातो. मागील काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. याआधी ७ जुलैला मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते, तर ९ जुलैला मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. आता तानसा तलावही भरल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
सध्या सातही तलावांमध्ये एकूण ८६.८८ टक्के जलसाठा असल्याचे महापालिकेने जाहीर केले असून, आगामी काही दिवसांत आणखी काही तलाव भरून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तानसा तलाव याआधी २०२४ मध्ये २४ जुलै, २०२३ मध्ये २६ जुलै, तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. यंदा तो गेल्या वर्षीपेक्षा एक दिवस आधी भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com