आयटीआयच्या २९ हजार जागा रिक्त
आयटीआयच्या २९ हजार जागा रिक्त
मुंबई, ता. २३ ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया आज पूर्ण झाली. यामध्ये उपलब्ध असलेल्या ४९ हजार ३४६ जागांपैकी केवळ अर्ध्याहून कमी असे एकूण २० हजार ३२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर, तब्बल २९ हजार ११८ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांवरील प्रवेशाची तिसरी फेरी २८ जुलैपासून सुरू केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीदरम्यान २० एकूण ३२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, त्यात सर्वाधिक शासकीय आयटीआयमधील १६ हजार ५२५ आणि खासगी संस्थांमध्ये तीन हजार ८०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवेशाच्या पहिल्या फेरीदरम्यान ८२ हजार ८३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यापैकी केवळ ४२ हजार १७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये ३१ हजार ७२९ आणि खासगी आयटीआयमध्ये १० हजार ४४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही फेऱ्यांमध्ये एक लाख ४७ हजार ४३२ जागा उपलब्ध असताना आतापर्यंत ६२ हजार ५१४ जागांवर प्रवेश झाल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरात आयटीआयच्या विशेषतः खासगी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.