चौथ्या फेरीत राज्यात ८४ हजार प्रवेश

चौथ्या फेरीत राज्यात ८४ हजार प्रवेश

Published on

चौथ्या फेरीत राज्यात ८४ हजार प्रवेश
अकरावीच्या वेळापत्रकात पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांना मन:स्ताप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रकियेत सुरू असलेला गोंधळ चौथ्या गुणवत्ता यादीपर्यंत कायम राहिला. वेळापत्रकानुसार ३१ जुलैला जाहीर होणारी यादी ३० जुलैलाच जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. राज्यात केवळ ८३ हजार ९४४, तर मुंबई विभागात १८ हजार ४७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश अलॉट झाले असून, शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत.
अकरावीच्या असंख्य विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आपल्या पसंतीची महाविद्यालये मिळाली नाहीत, तर अनेकांना अधिकचे गुण असून, या फेरीत प्रवेशच नाकारल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मुंबई विभागात चौथ्या फेरीसाठी ८२ हजार ८०० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी केवळ १८ हजार ४७४ जागांवर प्रवेश अलॉट झाले. उर्वरित तब्बल ६४ हजार ३२६ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबई विभागात प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कला शाखेतील एक हजार २०३, वाणिज्य शाखेतील १२ हजार १०२ आणि विज्ञान शाखेतील केवळ ५ हजार १६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन हजार ८७५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाची, तर दोन हजार ४३३ जणांना तिसऱ्या पसंतीची महाविद्यालये मिळाली आहेत.
--
२ ऑगस्टला प्रवेशाची मुदत
चौथ्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते २ ऑगस्ट रोजी सहा वाजेपर्यंत प्रवेश घेता येतील. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी रिक्त राहिलेल्या जागांची यादी जाहीर करून पुढील पाचवी फेरी जाहीर केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com