मुसळधार पावसाचा उच्च न्यायालयालाच्या कामकाजालाही फटका
मुसळधार पावसाचा उच्च न्यायालयालाच्या कामकाजालाही फटका
दिवसभरात अवघे दीड तास कामकाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुसळधार पावसाचा फटका मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजालाही बसला. मंगळवारी (ता. १९) अवघ्या दीड तासाचे कामकाज होऊ शकले. सामान्यतः उच्च न्यायालयाचे कामकाज हे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. परंतु पावसामुळे उच्च न्यायालयाचे कामकाज अवघ्या दीड तासात म्हणजे दुपारी १२.३० पर्यंत सुरू राहिले.
मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी पहाटेपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला. या पावसाचा परिणाम शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन प्रशासनाने सकाळीच सरकारी, निमसरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर अतिवृष्टी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. या पार्श्वभूमीवर वकील आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व न्यायालये दुपारी १२.३० पर्यंतच सुरू राहतील, अशी नोटीस उच्च न्यायालयाच्या वतीने सकाळी काढण्यात आली.
मुंबईत पावसाचा जोर सोमवारपासूनच कायम आहे. सोमवारी घरी जायला झालेला उशीर आणि मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे लोकल रेल्वे तसेच रस्ते वाहतूकसेवा विस्कळित झाली. त्यामुळे शिरस्तेदार, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्यायालयात पोहोचण्यास विलंब झाला. तर काही वकील, याचिकाकर्ते ऑनलाइन पद्धतीने न्यायालयात हजर असल्यामुळे मंगळवारी उच्च न्यायालयात उपस्थितांची संख्या अल्प प्रमाणात दिसून आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.