बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर सुहास सामंत यांचा राजीनामा
बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर सुहास सामंत यांचा राजीनामा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : बेस्ट पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कामगार शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला असून, पुढील निर्णय वरिष्ठांचा असेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची कामगार सेना आणि मनसे यांच्या समर्थकांचा उत्कर्ष पॅनल एकत्र रिंगणात उतरला होता. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेबंधू एकत्र आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती; मात्र अपेक्षेच्या विपरीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने तब्बल १४ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे कामगार सेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. कामगार सेनेचे बहुतांश सभासद बेस्ट पतपेढीशी जोडलेले असल्याने विजय निश्चित मानला जात होता; मात्र विद्यमान संचालक मंडळावरील गैरव्यवहाराच्या आरोपांचा ठळक परिणाम या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे कामगार सेनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सामंत यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत, ‘आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या निवडणुकीत आम्हाला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी मान्य करून मी राजीनामा देत आहे,’ असे स्पष्ट केले.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.