
आमटी, गरमागरम खिचडीचे वाटप
आंदोलन संपल्यावर कार्यकर्त्यांकडून जेवणावळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊ गल्ली बंद करण्यात आल्याने आंदोलकांचे हाल झाले होते; मात्र आंदोलन संपल्यावर कार्यकर्त्यांनी आमटी, खिचडी, भाकरी चटणीचे वाटप केले.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आरक्षणासाठी आंदोलन केले. पाच दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात पहिले दोन दिवस आंदोलकांचे खाण्या-पिण्याचे हाल झाले होते. त्यानंतर राज्यभरातून आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ, फळे आणि पाणी आझाद मैदानात आले. आता आंदोलन संपल्यावर मुंबईत आलेले अन्नपदार्थ वाया जाऊ नये म्हणून, आंदोलकांकडून जेवणाचे वाटप केले जात आहे.
==
पहिले दोन दिवस आमचे हाल झाले होते. आम्हाला जेवण, पाणी मिळाले नाही; मात्र आता आंदोलन संपल्याने आमटी आणि भाकरीचे वाटप करत आहोत.
- अण्णा जाधव, धाराशिव
==
आंदोलनासाठी खिचडी तयार करण्यात आली होती; परंतु आता आंदोलन संपल्याने आम्ही घरी निघालो आहोत. आजसाठी बनवलेल्या खिचडीचे वाटप करत आहोत.
- मिनीनाथ खंडागळे, अहिल्यानगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.