बारावीचा अर्ज भरण्यास २० ऑक्टाेबरपर्यंत मुदत
बारावीचा अर्ज भरण्यास
२० ऑक्टाेबरपर्यंत मुदत
पूरपरिस्थितीमुळे राज्य परीक्षा मंडळाचा निर्णय
मुंबई, ता. २९ : राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासोबतच दहावीच्या परीक्षेत १७ नंबरचा अर्ज भरून खासगीरीत्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा अर्ज भरण्याची ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची मुदत आहे. मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षणमंत्र्यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागामार्फत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.