‘आम्ही कधी प्रस्ताव घेऊन आलो होतो?’

‘आम्ही कधी प्रस्ताव घेऊन आलो होतो?’

Published on

‘आम्ही कधी प्रस्ताव घेऊन आलो होतो?’
मनसेचा काँग्रेसला सवाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः महाविकास आघाडीतील ‘तिसऱ्या भिडू’च्या चर्चेवरून काँग्रेस आणि मनसे आमनेसामने आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘आघाडीला तिसरा भिडू नको’ असे वक्तव्य केले होते. त्यावर आज मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसकडे आम्ही कधी युतीचा प्रस्ताव दिला होता? आम्ही कधी त्यांच्यासमोर हात पसरलेले नाहीत. आतापर्यंत युतीबाबत जी काही चर्चा सुरू आहे, ती फक्त अफवा आणि वावड्यांवर आधारित आहे.
अभ्यंकर यांनी पुढे स्पष्ट केले, की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी या पूर्णपणे अराजकीय आणि कौटुंबिक आहेत. त्यांचा कोणत्याही राजकीय युतीशी संबंध नाही. राज ठाकरे हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. भविष्यात युतीबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास तो तेच घेतील. सध्या कोणतीही औपचारिक चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. अभ्यंकर शेवटी म्हणाले, की योग्य वेळ आल्यावर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल. तोपर्यंत अशा प्रकारच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. आमचा अंतिम निर्णय हा राज ठाकरेच घेतील आणि त्यांच्या निर्णयावर संपूर्ण पक्ष ठाम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com