देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल : अॅड. प्रकाश आंबेडकर
देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल : अॅड. प्रकाश आंबेडकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर तीव्र टीका करीत थेट तीन प्रश्नांसह खुले आव्हान दिले आहे. भागवत यांनी ‘आरएसएस’च्या स्थापनेविषयी केलेल्या अलीकडील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी संघाच्या संविधानविरोधी भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
आंबेडकर म्हणाले, ‘मोहन भागवत, इकड-तिकडच्या गप्पा मारणे थांबवा. धाडस असेल तर माझ्या तीन प्रश्नांची सार्वजनिक उत्तरे द्या - आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का? आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारण्यास नकार दिला नाही का? गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान नाकारले नव्हतं का? असे प्रश्न आंबेडकर यांनी विचारले. पुढे ते म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडी आणि तिचे कार्यकर्ते आता मनुवादी शक्तींना थेट उत्तर देण्यासाठी एकत्र आले आहेत. हा देश मनुस्मृतीने नाही तर बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाने चालेल.’ यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद येथील आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढत संघाच्या विचारसरणीचा निषेध केला होता. दरम्यान, मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटले होते, की संघाची स्थापना १९२५ मध्ये ब्रिटिश काळात झाली होती, मग आम्ही ब्रिटिशांकडे कशी नोंदणी करणार? या विधानामुळे आरएसएस विरुद्ध संविधानवादी विचारसरणीचा संघर्ष पुन्हा एकदा तापला असून, देशभरात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

