बस अपघात गर्दीमुळे झाला!
बस अपघात गर्दीमुळे झाला!
भाडुंपप्रकरणी चालकाचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : डिसेंबर महिन्यात भांडुप रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या बेस्ट बसचा अपघात तेथील गर्दीमुळे झाला, आपला त्यामागे कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता, असा दावा बसचा चालक आणि आरोपी संतोष सावंतने जामिनाची मागणी करताना सत्र न्यायालयात केला आहे. या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता व दहा जण जखमी झाले होते.
भांडुप स्थानकाबाहेरील रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. हा रस्ता फेरीवाल्यांनीही व्यापलेला आहे. परिणामी घटनेच्या वेळी आपले वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याचा दावाही सावंतने जामीन अर्जात केला आहे. आपण हा अपघात हेतुपुरस्सर घडवून आणलेला नाही. तसेच आपण यापूर्वी कोणताही गुन्हा केलेला नाही, असेही सावंत याने अर्जात म्हटले आहे. आपण निर्दोष आहोत आणि या दुर्दैवी घटनेमुळे आपल्याला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले आहे, असा दावा करताना अपघाताच्या वेळेची परिस्थितीही त्याने जामीन अर्जात विशद केली आहे. भाडुंप स्थानकाबाहेर रस्ता अरुंद, गर्दीचा आणि फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. अचानक समोर आलेल्या एका रिक्षाला आणि पादचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्नात आपले बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या घटनेमागे कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता, असे सावंतने म्हटले आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची इलेक्ट्रिक बसने २९ डिसेंबरच्या रात्री भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर पादचाऱ्यांना धडक दिली होती. त्यानंतर बसचा चालक सावंतला भांडुप पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

