ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परवाना बंधनकारक

ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परवाना बंधनकारक

Published on

ई-रिक्षा, ई-बाइकसाठी परवाना बंधनकारक

मुंबई, ता. १३ : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाइकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, की आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती; मात्र वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा विचार करता केंद्र शासन अधिसूचनेअन्वये प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी ई-रिक्षा व ई-बाइकसाठीही परमिट (परवाना) प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. तसेच प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे आणि अनियमितता टाळणे, हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून एक खिडकी योजना सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com