अंबरनाथमध्ये ‘नदी संवाद’ यात्रेची सुरुवात

अंबरनाथमध्ये ‘नदी संवाद’ यात्रेची सुरुवात

अंबरनाथ, ता. ११ (बातमीदार) : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे नद्या अथवा जलाशयांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे, आदी अनेक बाबींचा विचार तसेच नदीच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमांतर्गत ‘नदी संवाद’ यात्रेची सुरुवात अंबरनाथमधून करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या नदी संवाद यात्रेच्या निमित्ताने अंबरनाथ रोटरी क्लबच्या वतीने रोटरी भवनमध्ये जलतज्ज्ञ जितेंद्र शहा यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शिक्षकांशी संवाद साधला. नदी आणि भविष्यातील उपलब्ध होणारे पाणी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com