अंबरनाथमध्ये आपदा मित्र प्रशिक्षणाला सुरुवात

अंबरनाथमध्ये आपदा मित्र प्रशिक्षणाला सुरुवात

अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) : अंबरनाथ येथे १२ दिवसांच्या आपदा मित्र निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी महाविद्यालयात १२ दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्‍घाटन तहसीलदार प्रशांती माने यांच्या हस्ते मंगळवार मंगळवारी (ता. १०) करण्यात आले. शिबिरामध्ये अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर येथील महाविद्यालयांतील एनएसएस, एनसीसी विद्यार्थी आणि तालुक्यातील इतर विभागातील १८ ते ४० वयोगटातील अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण देणार आहेत. या शिबिरामध्ये ९० आपदा मित्र यांची नोंदणी करण्यात आली आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीपासून संरक्षण, निवारण मदत आणि पुनर्वसन आदी प्रमुख प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com