होळीसाठी कोकणात 
एसटी २५० बस सोडणार

होळीसाठी कोकणात एसटी २५० बस सोडणार

मुंबई, ता. ७ ः होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त २५० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ते १२ मार्चदरम्यान या जाद्या बसगाड्या सोडल्या जातील, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
गणेशोत्सवाबरोबरच कोकणात होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपाल्या गावी जात असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या फेऱ्यांच्या आगाऊ आरक्षणासाठी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच मोबाईल ॲपचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com