धर्मांतर रोखण्यासाठी विहिंपने कंबर कसली

धर्मांतर रोखण्यासाठी विहिंपने कंबर कसली

Published on

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : सिंधी समाज मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असून ते रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने कंबर कसली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीच्या पार पडलेल्या बैठकीत परिषदेत सक्रिय असणारे ज्येष्ठ पत्रकार महेश मूलचंदानी यांची उल्हासनगर शहराच्या संघटन प्रमुखपदावर नियुक्ती करताना धर्मांतर रोखण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या वेळी शहरातील विश्व हिंदू परिषदेच्या धर्मप्रसार विभाग बळकट करण्यासाठी तसेच सिंधी समाजाचे इतर धर्मात होत असलेले धर्मांतरण थांबवून त्यांना पुन्हा हिंदू धर्माच्या प्रवाहात आणण्यासाठीच्या उपाययोजनेची सकारात्मक चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद केंद्रीय महासचिव आनंद गोयल, मुंबई क्षेत्र संगठन मंत्री श्रीरंग राजे, मुंबई क्षेत्र धर्म प्रसारप्रमुख अजय निलदावार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाबलानी, अंबरनाथचे सुनील कनौजिया, भाऊ लीलाराम साहेब, भाईसाहेब त्रिलोचन सिंग, भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष जमनू पुरुस्वानी, मनोहर खेमचंदानी, प्रदीप रामचंदानी, राजा गेमनानी, दीपक छतलानी, गोपी वाधवानी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.